Wednesday 1 June 2011

सर्प ...


पावसाळा सुरू झाला की अनेकदा जमिनीत कुठे-कुठे दडून बसलेले हे सरपटणारे प्राणी वर येतात आणि मानवी सहवासात येऊन अडचणीतही सापडतात. अशा वेळी अनेकजण त्यांना स्वतःच्या सुरक्षेसाठी मारायचे ठरवतात. पण खरेतर ते पकडून सहज इतरस्त हलवता येतात. गेली काहीवर्षे सर्पमित्रांनी ही मोहीम जोरात राबबलेली आहे. असे सर्प कुठे दिसले आहेत अशी हाक ऐकू आली की धाव मारायची आणि त्यांना सुखरूप जंगलाच्या भागात नेऊन सोडायचे. मागे एकदा असेच मानवी वस्तीत सापडलेले साप सर्पमित्रांनी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर भागात सोडले. तेंव्हा घेतेलेली काही प्रकाशचित्रे...


१. सकाळी सकाळी पाटोणपाडा येथे जमून जंगलाच्या आतील भागाकडे कूच...





 २. चेना नाल्याच्या सुकलेल्या पात्रापाशी साप सोडायचे ठरले होते.



३. धामण (Indian Rat Snake) हाताळताना

रच्याकने ...तो मागे पिवळा टी-शर्ट घालून मुलगा उभा आहे  त्याच्याकडे बघा. आणि पुढच्या फोटोत त्याचे हावभाव पण बघा... :)


 
४. ह्या सापाचे नाव कोणी सांगेल का?




५. विषारी दात नसल्याने धामण आपले भक्ष्य गुदमरून मारते. बचाव ही तसाच.




६. मग काही जणांना ती धामण हाताळायला दिली.




७. घोणस (Indian Viper) जातीचे विषारी दात.




 ८. हा आपल्या सर्वांचा लाडका.. नाग (Indian spectacle cobra)



9. फणा काढलेला नाग कित्ती सुंदर दिसतो नाही!!!



 १०. फणा काढलेला नाग कित्ती सुंदर दिसतो नाही!!!



११. पिवळा नाग... 



१२. मण्यार (Indian Commom cret) - 




१३. पिवळी धामण - बिन विषारी.




रच्याकने ... तुम्हाला कधी साप आडवा आला तर तुम्ही काय कराल??

Friday 27 May 2011

ऐतिहासिक भटकंती ...

छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२२ व्या पुण्यतिथीनिमित्त यंदाच्या फाल्गुन अमावास्येला वढू - तुळापुर येथे जाणे झाले. शिवाय तिथूनच जवळच असलेल्या इंदोरी येथील खंडेराव दाभाडे यांनी बांधलेल्या किल्ल्याची आणि वडगाव येथील दुसऱ्या मराठा - इंग्रज युद्धाचे स्मारक असलेल्या ठिकाणी घेतलेली काही क्षणचित्रे...


तुळापुरचा इतिहास - तुळापुरचे मूळनाव नागरगाव असे होते. १६३३ मध्ये शहाजी राजांनी या ठिकाणी हत्तीचा वापर करून तुळा केल्यानंतर ह्या जागेचे नाव तुळापुर करण्यात आले. ह्या प्रसंगी रुद्रनाथ महाराजांच्या आदेशावरून मुरार जगदेव आणि शहाजी महाराज यांनी येथील संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. नदीकाठी सुंदर घाट बांधला ज्याचे उद्घाटन राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या हस्ते झाले. ह्यावेळी शिवाजी राजे अवघ्या ३ वर्षांचे होते.

पुढे १६८९ मध्ये ह्याच ठिकाणी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची निघृण हत्या करून, त्यांच्या देहाची विटंबना करून, शरीराचे तुकडे नदीपलीकडे फेकून दिले. नदीच्या पलीकडे वढू नावाचे गाव आहे तेथील काही लोकांनी त्यांच्या शरीराचे उरले-सुरलेले अवयव एकत्र शिवून त्यांना भडाग्नी दिला. ज्या लोकांनी हे काम केले त्यांचे आडनाव आता 'शिवले' असे आहे. आजही गावात मोठ्या प्रामाणावर शिवले आडनावाच्या लोकांची वस्ती आहे. तुळापुर बरोबर वढू येथे देखील संभाजी राजांचे एक स्मारक उभारलेले आहे.



१. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा - तुळापुर.



 २. कवी कलश यांची समाधी - तुळापुर.



 ३. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी - तुळापुर



४. समाधी समोरील संगमेश्वर मंदिर.



 ५. भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांचा त्रिवेणी संगम.

 


 ६. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी - वढू
 


 ७. वढू येथे काढलेली रांगोळी -



 आम्ही मग तिथून निघालो आणि देहू मार्गे इंदोरी येथे गेलो.

८. देहू येथील तुकाराम महाराजांचे गाथा मंदिर -



९. इंदोरी किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार.. दरवाज्यासमोरच आता अतिक्रमण झाले आहे. हा किला अजूनही दाभाडे यांच्या मालकीचा आहे.



 १०. किल्ल्यामागून वाहणारी इंद्रायणी नदी -
 


 ११. किल्ल्याच्या दरवाजा २ माजली असून आतील बांधकाम विटांचे आहे.



 इंदोरी वरून २० एक मिनिटात जुन्या मुंबई-पुणे हायवेवर बाहेर पडता येते. तिथून वडगाव येथे रस्त्याच्या बाजूलाच हे छोटेसे पण सुंदर स्मारक बांधलेले आहे.
 

१२. वडगाव येथील मराठा - इंग्रज युद्धाचे स्मारक. ब्रिटीश अधिकारी नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करताना.



 १३. युद्धाचा संक्षिप्त इतिहास - मराठीत.



 १४. युद्धाचा संक्षिप्त इतिहास - इंग्रजीत.
 


 १५. महादजी शिंदे यांचा वीरासनातील पुतळा -



 १६. पुतळा आणि विजयस्तंभ
 


१७. महादजी शिंदे यांचा विरासानातील पुतळा - सूर्यास्त होता होता.
 


समाप्त...